वसमत प्रतिनिधी:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समता दूत मिलिंद आळणे गुरुनाथ गाडेकर सर्वप्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी दवणे मॅडम अध्यक्षस्थानी होत्या प्रमुख पाहुणे योगानंद शाळेचे सर उपस्थित होते साने गुरुजींनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार राष्ट्रसेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले पत्री व त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली त्यातील बलसागर भारत होवो.
या गीतांने तरुणांना स्फुरण चढले या गीताने प्रेरित होऊन हजारो तरुण स्वतंत्र चळवळीत सहभागी झाले या गीताचा वाढता प्रसार पाहून इंग्रज सरकारने या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त करून या गीतावर बंदी आणली साने गुरुजींना अस्पृश्यता जातीपात रूढी परंपरा अंधश्रद्धा याविषयी कमालीची चीड होती. या गोष्टींना त्यांनी नेहमीच विरोध केला होता.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांनाही प्रवेश मिळावा यासाठी 1946 साली त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला त्यासाठी त्यांनी उपोषण केले.त्यांच्या या प्रयत्नामुळे पंढरपुराच्या विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे यावेळी म्हटले गेले यावेळी दवणे मॅडम, आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर, रमा काबळे, योगानंद शाळेचे शिक्षक मुले मोठया संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन रमा काबळे यांनी केले.
*मिलिंद आळणे - वसमत*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111