shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विजय नगरकर मित्र मंडळाच्यावतीने राजेंद्र लांडगे यांचा वाढदिवस साजरा

श्रीरामपूर जिल्हा होणे आजच्या मितीस काळाची गरज - शौकतभाई शेख

श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डॉक्टर शिवराज नगरकर सभागृहात 
विजय नगरकर मित्र मंडळाच्यावतीने श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (ऊर्फ राजाभाऊ) लांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख होते.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी श्री.लांडगे यांच्या श्रीरामपूर जिल्ह्यासाठी करत असलेल्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आपल्या शुभेच्छारुपी मनोगताद्वारे प्रकाशझोत टाकला.

यावेळी नागेशभाई सांवत यांनी आपल्या दमदार शैलीत श्रीरामपूर जिल्हा का आवश्यक आहे याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,मी कामगार नेता या नात्याने गेली अनेक वर्षे कामगार चळवळ चालवत आहे, कामगारांच्या काय समस्या असतात त्या मी जवळून बघतो आहे, आम्ही सर्व श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अग्रही असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार उपलब्ध होवून कोणासही कामासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, श्री.राजाभाऊ लांडगे यांनी मोठा जिव्हाळ्याचा तथा सर्वांच्या फायद्याचा विषय हाथी घेतला आहे,त्यास लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विजय नगरकर म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्री.राजाभाऊ लांडगे यांनी स्वतः पदरमोड करत मोठी चळवळ उभारली आहे, त्यांचे हे कार्य भविष्यात सर्वांसाठी खुपच फायद्याचे ठरणार असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास स्थानिक तरुणांना नोकरीसाठी इतरत्र भटकंती करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख म्हणाले की,
श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवनवीन उद्योग, व्यावसाय श्रीरामपूर जिल्ह्यात येतील स्थानिकांना यानिमित्ताने मोठा रोजगार उपलब्ध होईल,कामांच्या शोधात कोणास बाहेरगावी जाण्याची आवश्यकता राहणार नाही, राजाभाऊ लांडगे यांचा हा संघर्ष हा समस्त भावी श्रीरामपूर जिल्हावासियांसाठीचा आहे.
श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या जिकरीने चळवळी चालवित आहेत, श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही आजच्या मितीस काळाची गरज असल्याने आज ना उद्या शासनास श्रीरामपूर जिल्हा करावाच लागणार असल्याचेही ते म्हणाले.

तर सत्काराला उत्तराखातर श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढाणार  असल्याचा श्री. राजाभाऊ लांडगे यांनी पुनरुच्चार करत वाढदिवस प्रित्यर्थ केलेला सत्कार हा लाख मोलाचा आहे यातून आपल्या सर्वांचे स्नेह,प्रेम आणी आपूलकीचे दर्शन घडले असे म्हणत उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर, कामगार नेते नागेश भाई सावंत, समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे माणिकराव जाधव, विधिज्ञ सोपानराव पठारे अशोक लोंढे, हाफिज अनिस पठाण, सुनील इंगळे, संजय सोमवंशी, रॉयल रिश्ता डॉटकॉम चे कलीमभाई शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऍड.सोपानराव पटारे यांनी केले तर अशोक लोंढे यांनी आभार मानले.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close