श्रीरामपूर / प्रतिनिधी:
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपूर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पालखीमध्ये हजारो भाविक टाळ मृदंगाच्या गजरात पालखी समवेत चालत आहेत. त्यात श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प.सौ.कांचनताई सतीषराव जगताप या पालखी सोहळ्या निमित्त श्रीरामपूरात दाखल झाले असता त्यांचा अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी औक्षण करून सन्मान केला. तसेच श्रीराम मंदिर कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ह.भ.प.सौ.कांचनताई जगताप यांनी दोन महिन्यापूर्वी संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा नव्याने सांभाळली असता या पालखी सोहळ्यात अनेक सुविधा देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. सुमारे पन्नास हजार वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्या प्रसंगी शहरामध्ये भक्तीमय वातावरण दिसत होते. यावेळी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, ह.भ.प.सतिषराव महाराज जगताप, दिंडीचे मानकरी ह.भ.प.मोहन महाराज हिरवे बेलापूरकर, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, श्रीराम मंदिर विश्वस्त सौ.प्रणिती गिरमे, रमेश कोठारी, गौतम उपाध्ये, संजय कोठारी, राहुल कोठारी, मिलिंदकुमार साळवे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, नानासाहेब गांगड, संदीप डावखर, संदीप शेरमाळे, मधुरा कुंदे, आरती डेरे, मनीषा त्रिभुवन, मोना हिरे, प्रदीप चिंधे, अजित देठे, कैलास भागवत आदी उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ,
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111