shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकमान्य टिळक यांनी जनतेला स्वराज्याची प्रेरणा दिली - ससाणे


श्रीरामपूर / प्रतिनिधी :
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करत भारतीय जनतेला स्वराज्याची प्रेरणा दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. 

             ससाणे पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी देशांमध्ये स्वदेशी उत्पादनाचा पुरस्कार, विदेशीचा बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य हा चतुसूत्री कार्यक्रम राबवून स्वराज्याची चळवळ अधिक मजबूत केली. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव या उत्सवांच्या माध्यमातून जनतेला स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती दिली. अनेक वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिलेल्या भारतीय जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद , रावसाहेब आल्हाट, अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, सुनील साबळे, रितेश एडके, रियाज खान पठाण, नवाज जहागीरदार, बाबा वायदंडे, योगेश गायकवाड, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close