प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ नशा मुक्त भारत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांचा नशा मुक्त व सशक्त भारत अभियान जिल्हा परिषद शाळा नंबर एक कळंब जिल्हा धाराशिव महाराष्ट्र येथे हा संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. मुलांनी शालेय जीवनात कसे वागले पाहिजे आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणातील चांगले काय आणि वाईट काय आहे हे समजणे त्याची जाण असणे अत्यंत आवश्यक आहे.
वाईट क्षमतेच्या नादाने आपले जीवन खराब करू नका भविष्यात कोणत्याही नशेच्या आहारी जाऊ नका तंबाखू, गुटखा, मावा, दारू इत्यादी गोष्टी ग्रामीण भागात आपले पालकच मुलांना सांगत असतात वडीलधारी मंडळी सुद्धा मुलांना अशा वस्तू आणायला लावतात तर अशावेळी मुलांनी पण या गोष्टी आणण्यास नकार दिला पाहिजे आणि पालकांनी देखील आपल्या मुलास कोणते काम सांगावे कोणते सांगू नये याच्यावर विचार करणे गरजेचे आहे. असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांनी आयोजित केला होता. या उपक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे श्री अरविंद शिंदे सर हे होते. रोटरी क्लब हे नेहमीच सामाजिक उपक्रमास सहकार्य करते असे वक्तव्य महेश वैद्य यांनी केले. या उपक्रमात ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम कसा करावा याचे बेसिक ट्रेनिंग प्रत्यक्ष कृतीद्वारे दिले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून आला.
मुलांना व्यायामाचे महत्त्व समजून रोजच्या जीवनात व्यायाम दररोज करावा त्याने आपले शरीर निरोगी आणि सशक्त राहील असे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पण उपक्रमात सहभाग घेतला हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला.