शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्री साईबाबांचे समकालीन साई भक्त लक्ष्मण मामा व त्यांचे पुत्र बाप्पाजी काका यांच्या घरातील भीमाशंकर बाप्पाजी रत्नपारखी यांच्या पत्नी श्रीमती विमलताई यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल साई गोल्ड शिरडी येथे करण्यात आले होते. यावेळी श्री साईचरित पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी सुप्रसिद्ध नारदिय कीर्तनकार प्रवचनकार ह भ प श्री प्रभंजन भगत महाराज यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या प्रवचनात त्यांनी स्तवन मंजिरी तसेच साई चरित्र यातील काही दाखले दिले. आई व साई यांच्यातील साम्य अशा विषयावर प्रबोधन केले.
निरूपणासाठी साई स्तवन मंजीरी यातील तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू ही ओवी घेत निरूपण केले. श्री साईबाबांनी आपल्याच भक्तांना भक्तीचा वसा कसा दिला व त्यातूनही काय लीला घडवली याची समर्पक दाखले दिले. लक्ष्मण मामा व त्यांच्या परिवाराला बाबांनी काय सेवा दिली अन् बाबा कशी स्वीकारत आहेत या बद्दल विवेचन केले. सामाजिक कार्यात असणारे विनायक रत्नपारखी यांच्या मातोश्री कै.श्री विमलताई ह्या बाबांची सेवा कशी करावी याचे उत्तम उदा. आहेत. तो सध्याचा एक उत्तम आदर्श असेल. बाबांची उदी (अंगारा) यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांची पांडुरंगाची सेवा बघून बाप्पाजी काकांना नेहमीच त्यांचा अभिमान वाटायचा.
विठ्ठल भक्तीचा वारसा असणारे लक्ष्मणमामा साई भक्ती हे एकच तत्व आहे असे मानत असत. काकड आरती तू कर व मी हा देह सोडला आहे. परंतु मी इथेच आहे याची खात्री बाबांनी या लीलेतून करून दिली. त्याचा अनुभव आज प्रत्येकास नक्कीच येत आहे. साई विठ्ठल भक्तीचा वारसा रत्नपारखी कुटुंबात आजही चालूच आहे.प्रवचन झाल्यावर भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन वैभव शास्त्री यांनी केले. तर महाराजांचा सत्कार रत्नपारखी कुटुंबीयांनी केला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमास भाजप नेते राजेंद्र भाऊ गोंदकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप शिवसेना नेते कमलाकर कोते सचिन कोते तुकाराम गोंदकर दादासाहेब कोते रमेश शेळके धनंजय पाटील संदेश खोत बा रा जोशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहेरचे नाव कमल लग्ना नंतर विमल झाले.
लहान असतानाच आई वडिलांचे छत्र हरपले.
बहिणीच्या नंदेने सांभाळ केला. त्यांनी आपल्या मुली प्रमाणेच सांभाळ केला.नंदेचे मालक महाराष्ट्र बँकेत अधिकारी होते. पुढे त्यांची बदली कोपरगाव येथे झाली. त्यातूनच पुढे काही ओळखीतून त्यांचा रत्नपारखी कुटुंबात भीमाशंकर यांच्याशी विवाह झाला. रत्नपारखी परिवार तसा श्री साईबाबा यांच्या सानिध्यात असणारा साईभक्त लक्ष्मण मामा, दीपक वरुळे नगरसेवक, बप्पाजी काका यांचा होता.
त्यामुळे बाबांचा विशेष वरद हस्त या परिवारावर आहे. कमल यांचे येथे बंध जुळणे हाही बाबंच्याच लिलेचा एक भाग होता. कारण पंढरपूर माहेर असणाऱ्या कमल यांचे थेट शिर्डीतील कुटुंबात आगमन झाले होते.
शिरडी माझे पंढरपूर याची दासगणूना दिलेली साक्ष व लक्ष्मण मामा यांना दिलेला विठ्ठल मंदिराचा वसा. हे बरेच काही सांगून जाते.बाप्पाजी काकांचे भीमाशंकर हे चिरंजीव होत. भीमाशंकर हे विवाहित होते परंतु काही आजारपणाने त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले.
त्यामुळे त्यांचा स्वभाव अधिकच कडक झाला होता.
अशातच हे लग्नास त्यांना तयार होणे तसे कठीण होते. परंतु आपल्या दोन मुलांचं कसं होणार ते लहान आहेत त्यांना आईची माया गरजेची आहे हे लक्षात घेऊन त्यांनी दुसरा विवाह कमल म्हणजेच विमल यांच्याशी केला. सुरुवाती पासूनच आहे त्या वातावरणाशी समरस होणे हा तर त्यांचा स्वभावच बनलेला होता. माहेरी ही शेतकरी कुटुंबातच असल्याने त्यांनी खूप काम करत सर्व सामन्य आयुष्य जगले होते. त्यामुळे शिर्डीत आल्यावर त्यांना मिळते जुळते घ्यायला फार वेळ लागला नाही. पतीचा स्वभाव फार कडक पण त्यावरही त्यांनी आपली आपुलकीची फुकर घातली.आणि संसार गोड केला.
सासर माहेर चे नाते त्यांनी मोठ्या अभिमानाने जपले.
त्यांचे वडील शाळा मास्तर होते. वडील अनेक ठिकाणी बदली होत असल्याने कमल हिला घेऊनच फिरायचे. त्यामुळे लहान वयातच काही धडे त्यांना अप्रत्यक्ष मिळाले.
त्यांना एकूण चार भाऊ अन् चार बहिणी. सर्वात मोठी बहीण ही डॉक्टर प्रबोध जोशी यांची आई सत्यभामा.त्यामुळे प्रबोध जोशी हे डॉक्टर झाल्याचा त्यांना खूप अभिमान होता. नेहमीच त्या त्यांचे कौतुक करत. आपल्या संसारात त्यांना एकूण तीन मुले. मुलांचे शिक्षण संस्कार याकडे विशेष लक्ष दिले. त्यांना तीन मुले सूना नातवंडे पणतू पणती असे गोकुळ लाभले. आलेले कार्य हसत खेळत करण्याची त्यांची कला मोठी विलक्षण होती. त्यांना माणसे जोडण्याची मोठी आवड सदा हसत मुखाने स्वागत करण्याचा त्यांचा स्वभाव मनामनात आजही आहे. त्या आजही आपल्या जवळच असल्याचा अनुभव सतत होत आहे. त्यांचं अचानक जाणं हा वेदनेचा विषय आहे. त्यांचा माघारी तीन मुले सूना नातवंडे पणतू पणती असा परिवार आहे.