कोपरगांव / प्रतिनिधी:
कोपरगाव तालुक्यातील धामोरी, मोर्वीस, चासनळी, मायगाव देवी, सांगवी भुसार या गावांतील नागरिकांचे दररोज तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच कोपरगांव ला दैनंदिन कामासाठी जावे - यावे लागले. परंतु सांगावी भुसार, काळ धोंडो ते रवंदा गाढे वस्ती दरम्यान रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे छोटेमोठे अपघात ही होतात.
अन् त्यातच रस्त्याच्या कडेला वेडीभाभळींची साम्राज्य असल्याने अपघातास निमंत्रण दिले जात आहेत, तरी लवकरात लवकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेवुन या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था बघून ह्या मार्गावरील रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी धामोरी, मोर्वीस,चास नळी,मायगाव देवी,सांगवी भुसार येथील प्रवाशी तथा नागरिकांकडून केली जात आहे.
*वृत्त विशेष सहयोग
दत्तात्रय घुले,धामोरी - कोपरगांव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११