सोनई प्रतिनिधी
सोनईमध्ये हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण केल्याच्या कारणावरून दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दहशत निर्माण केल्याप्रकरणी सोनईमध्ये सकाळी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादित म्हटले, बालाजी नगरमध्ये गाडी हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरून वैभव वाघ, अक्षय पंडित, आकाश काकडे, अभिषेक त्रिभुवन, अक्षय साळवे, सचिन काकडे, ऋषी गायकवाड, गणेश वैरागर (रा. सोनई) निखिल जाधव, विनोद वाघमारे (रा.
ब्राम्हणी) व त्यांच्या सोबतच्या १५ ते २० अनोळखी इसमांनी हातात लाकडी दांडके व धारदार तलवार घेऊन बालाजी मंदिर परिसरात दहशत निर्माण केली. घरांवर दगड फेकून हातात तलवारी फिरविल्या, सारिका धनवटे तसेच कोमल गुंजाळ यांना जाणीवपूर्वक शिवीगाळ करून सोनईत फक्त आर जे कंपनीचीच दहशत चालणारअशी धमकी दिली. काल संपूर्ण सोनई गाव कडकडीत बंद ठेवून ग्रामस्थांच्या वतीने सोनई पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. आर जे कंपनी गुन्हेगारी टोळीला गुन्हेगारी टोळी म्हणून घोषित करावे, या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.