shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांना सत्यमेव जयते रत्नदीप राज्य गौरव पुरस्कार प्रदान..


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मुंबई येथील आशादीप आधार मंच व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जन सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा सत्यमेव जयते रत्नदीप राज्य गौरव पुरस्कार श्रीरामपूर येथील नागेबाबा परिवाराचे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांना देण्यात आला आहे .
पुरस्काराचे वितरण पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, बळीराजा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बालम, नानाजी ठक्कर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, भाई जगताप, हेमंत पवार, ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना किसन बोंद्रे, राष्ट्रीय समाज भूषण समाजसेवक आशा भोईर, आशादीप महिला आधार मंच अध्यक्षा संगीता गुरव, मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर, नाट्य अभिनेत्री निशा जाधव, ॲड. आदिती गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नागेबाबा परिवाराचे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गायकवाड यांनी आजपर्यंत गरजू रूग्णांना सात कोटी रुपयांची मदत मिळवून दिली आहे, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी, आयुष्यमान भारत योजना, मुंबईमधील अनेक सेवाभावी संस्था, मुंबईतील ट्रस्टी हॉस्पिटलमध्ये गरीब रूग्णांसाठी १० टक्के आरक्षित कोटा असतो. श्री. गायकवड यांनी योजनांचा जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून दिला आहे. 
श्री.गायकवाड यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साई ग्रुप,ज्येष्ठ नागरिक ग्रुप, सावता प्रतिष्ठान श्रीरामपूर, समता परिषद श्रीरामपूर,
समता फाऊंडेशन श्रीरामपूर, माळी महासंघ, श्रीरामपूर, ज्येष्ठ नागरिक संघ श्रीरामपूर, संजय निराधार कमिटीचे तालुका अध्यक्ष गणेश मुद्गुले, सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कुदळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, साई ग्रुपचे अध्यक्ष सुरेंद्र गिरमे, समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, निमगाव खैरी ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close